मुंबई

ही बाेट ठरणार रायगडसाठी संजीवनी

प्रमाेद जाधव

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबई, नवी मुंबईतील रुग्णालयात नेण्यासाठी खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे कसरत करावी लागते. या समस्येमुळे अनेकांचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी रुग्णवाहिका बोट सेवा सुरू करण्यात येणार आहे. मांडवा ते भाऊचा धक्का या जलमार्गावर ही धावणार आहे. जिल्ह्यासाठी वरदान ठरणारी ही सेवा मे महिन्यापासून सुरू होईल. हा भारतातील पहिला प्रयोग आहे. 

अलिबाग या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून रुग्ण येतात. परंतु डॉक्‍टरांची कमतरता, आधुनिक साहित्यांचा अभाव आदी कारणांमुळे अनेक रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबई, नवी मुंबईत पाठवण्यात येते. परंतु या ठिकाणी घेऊन जाताना रुग्णवाहिकेच्या मार्गात अडथळे येतात. त्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा समावेश आहे. 
पावसाळ्यात तर रुग्णवाहिका तासन्‌ तास कोंडीत अडकतात. त्यामुळे अनेकांवर रुग्णवाहिकेतच जीव गमावण्याची वेळ येते. 

धक्कादायक : गुजरातमधून येणारा हा पदार्थ तुम्हाला आजारी पाडू शकतो

रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नियोजनाच्या बैठकीत रुग्णवाहिका बोट सुरू करण्याची मागणी केली. त्याला उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. स्पीड बोट आणि रुग्णवाहिकेसाठी तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यात एमबीबीएस, बीएमएस असे दोन डॉक्‍टर, दोन कर्मचारी, परिचारिका, तांडेल, औषधे आणि ऑक्‍सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून आरोग्य विभागाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. 

अशी आहे सेवा 
स्पीड बोट रुग्णवाहिकेसह मांडवा येथे समुद्रकिनारी उभी राहणार आहे. गंभीर आजार व दुखापत झालेल्या रुग्णांना मांडवा येथे आणल्यावर तेथून रुग्णवाहिका बोटीमध्ये ठेवण्यात येईल. या बोटीद्वारे 20 मिनिटात भाऊचा धक्का, त्यानंतर रुग्णाला संबंधित रुग्णालयात घेऊन जाणार आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर खरंच BCCI चा अध्यक्ष होणार का? मास्टर ब्लास्टरची टीम म्हणते, तुम्ही जे ऐकलं आहे ते...

Latest Marathi News Updates Live : काश्मीरहून दिल्लीला ३६ टन सफरचंद पाठवले जाणार

Manchar News : स्मार्ट मीटरमुळे गरीब शेतमजुरांवर लाखोंचे वीजबिल, आंबेगावात कुटुंब अंधारात

ST Reservation : बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षणासाठी अन्नत्याग उपोषण; भिलदरीत तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली

SCROLL FOR NEXT